Mumbai News Today: नामांतराच्या वादातून हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दिलासा! नेमका निर्णय काय?

Mumbai High Court News Today: मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये नामांतराबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

मुंबई : राज्य सरकारला नामांतराच्या वादावर मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टान फेटाळलं. राज्य सरकारनं महसूल विभागाकरता शहरांच्या नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयानं कुणाचंही नुकसान नाही, असं मुंबई हायकोर्टानं निर्णय देताना स्पष्ट केलंय. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये नामांतराबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. त्यावर अखेर आज निर्णय जाहीर करत राज्य सरकारला नामांतराच्या वादावर मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com