मुंबईत मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली असून, या पावसाचा परिणाम शहरातील दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो आहे. विशेषतः मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा मोठा फटका बसला असून, गाड्या सरासरी २० ते २५ मिनिटं उशीराने धावत आहेत. सकाळच्या वेळेस कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे ट्रॅकवर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले नसले तरी सततच्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. उपनगरांमधून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील काही तासांतही अतिवृष्टीचा इशारा दिला असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.