Mumbai Water Crisis| मुंबईकरांवर पाणी संकट, पाच टक्के पाणी कपात

मुंबईत पाणीकपात घोषित करण्यात आली आहे. ३० मे पासून ५ टक्के पाणी कपात घोषित करण्यात आली आहे. जलाशयातील पाणीपुरवठा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्याची झळ आता राजधानी मुंबईलाही बसणार आहे. मुंबईत पाच टक्के पाणीकपात होणार आहे. 30 मे पासून ही पाणीकपात होणार असल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले आहे. तर ५ जूनपासून ही कपात १० टक्क्यांवर जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातला पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे हा निर्ण घेण्यात आला आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. राज्यातल्या अनेक भागात पाणीबाणी निर्माण झाली असून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांत विहिरी आणि बोर अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com