बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरांवर हल्ले होत आहेत. तेथील इस्कॉनच्या प्रमुखांना अटक झाली आहे. हिंदूंचे खून होत आहेत. हे सर्व चिंताजनक आहे. बांगलादेशाऐवजी असं काही पाकिस्तानात झालं असतं तर नरेंद्र मोदींनी इंडिया गेट समोर भाषण करुन पाकिस्तानात घुसून मारू असा दावा केला असता. मात्र आता केवळ सचिव पातळीवर चर्चा सुरू आहेत. असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी बांगलादेशाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, बांगलादेशातील हे सर्व चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचलित करत नसेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी आणि ढोंग करत आहे. यांना फक्त हिंदूंच्या बाबतीत मतांचे राजकारण करायचे आहे. आता देशात कुठेच निवडणुका नाही. बांगलादेशमध्येही यांना निवडणूक लढवायच्या नाहीत. त्यामुळे याबाबत काहीही बोललं जात नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान हिंदुत्ववादी असतील तर केवळ सचिव पातळीवर चर्चा करण्यापेक्षा त्यांनी स्वतः याकडे लक्ष घातलं पाहिजे. हिंदूंवरील अत्याचार हा केवळ बांगलादेशाचा अंतर्गत विषय नाही. हा आपल्या देशाचा देखील विषय आहे. देशातील हिंदूंवर अत्याचार होत असेल तर तो आपल्या देशाचा देखील विषय आहे. देशभरात हिंदूंवरील अत्याचार विरोधात आंदोलनं होत आहेत. मात्र, यामध्ये भाजप आणि आरएसएस कुठेही नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.