राज्यातल्या विधानसभा निवडणुका होऊन महिना झाला आहे. तरी राज्यात अजूनही सरकार नाही. स्वत:चं मंत्रिमंडळ देखील या सरकारला ठरवता येत नाही. त्यासाठी दिल्लीत जावं लागतं. बहुमत असलेले सरकार जर राज्य चालवत नसेल तर या राज्याचे काय होणार? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातली स्थिती बिकट आहे. राज्याला आरोग्य मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही. राज्यात रस्त्यावर खून पडत आहेत आणि राज्याचा राजा उत्सवात मग्न असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कोणाला मंत्री करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तीन पक्षाचे लोकच एकमेकांच्या विरोधातील फाईली आणून देणार आहे. इतकंच नाही तर अशा फाईली आणून देण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे नागपूर येथील अधिवेशनाच एखादा स्फोट होऊ शकतो, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. अजित पवार हे सध्या स्वतः गडबडलेले दिसत आहे. या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.