Air India News | एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल, 700 हून अधिक उड्डाणं रद्द
एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. एअर इंडियाचे 700 हून अधिक आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उड्डाणं रद्द झाले आहेत. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया आणि एअर एक्सप्रेसचं लवकरच विलीनीकरण होणार आहे. या निर्णयामुळे आपल्या नोकऱ्या जातील अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कमी असल्याने त्याचा परिणाम एअर इंडियाच्या कामकाजावर झाला आहे. अशा वेळी प्रवाशांनी चौकशी करूनच विमातळावर यावं असे आवाहन कंपनीने केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.