मनोज जरांगे पाटील यांनी आज नागपूरमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. बच्चू कडू यांची भेट घेत ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सरकारकडे केली. त्याचसोबत त्यांनी सरकारला इशारा देखील दिला. सरकारला घोडे लावणार, असा घणाघात त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी इथे एक शेतकरी पुत्र म्हणू आलो आहे. मी कसलाही सल्ला द्यायाला आलो नाही. सरकारने डाव टाकला म्हणून आलो आहे. सरकारने डाव टाकला आहे पण हा डाव आता प्रतिडावानेच मोडावा लागेल. तरच आपण यशस्वी होऊ. आंदोलनाचा मूळ गाभा हे आंदोलकच आहेत हे विसरू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
लढायचे कसे ते सांगा. कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे. ती म्हणजे पब्लिक आहे आणि आपण ईमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही. जे आहे ते आहे. पण आपण नीट करतो. यांना घोडे लावल्याशिवाय हे नीट होत नाही. नाही तर न्याय नाही न काहीबी नाही . हे अशा स्वरूपाचे आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.