Manoj Jarange News: नोंदी रद्द केल्या तर..288 आमदार पाडू; जरांगेंचा सरकारला थेट इशारा!

Dharashiv News: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला फक्त 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच जरांगेंनी धाराशिवच्या सभेत सरकारला थेट इशाराच दिला आहे.

धाराशिव: मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये शांतता रॅली पार पडली.या रॅलीदरम्यान जरांगेंनी छगन भुजबळांवर तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.जर कुणबी नोंदी रद्द केल्या तर.. 288 आमदार पाडू असा थेट इशाराच जरांगेंनी सरकारला दिला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर नोंदी रद्द करुन दाखवा, मराठ्यांची ताकद काय असेल तुम्हाला कळेल,असा सज्जड दम जरांगेंनी सरकारला दिलाय.देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना ताकद देत आहेत, भुजबळांमुळे सरकार पडेल, असं देखील मनोज जरांगे भर सभेत म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com