Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह रायगडला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा!
मुंबई : मुंबई ठाण्यासह उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तसंच रायगडलाही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर लोकांनीही काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळी शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळावं, असं सांगितलं जातंय. मुंबईत सोमवारी ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारीही मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये कमाल तापमानात मोठी नोंद करण्यात आली होती. तापमान सरासरीपेक्षा ४.८ अंशानी अधिक असल्याचं बघायला मिळालं होतं. एप्रिल महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.