लाडकी बहीण योजनेमुळे सरकार काही योजना बंद करण्याच्या विचारात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात शिवभोजन थाळी देखील बंद करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसंच आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा आदेश देखील आता रद्द करण्यात आलेला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली. या योजनेत केवळ १० रुपयात प्रत्येकाला जेवण देण्यात येतं. मात्र आता ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. शिवभोजनच्या रोज २ लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटींचा खर्च येतो. त्यामुळे तिजोरीवर भार वाढत आहे, असल्याचं बोललं जात आहे.
तर दुसरीकडे आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा देखील आदेश आता रद्द करण्यात आलेला आहे. विधानमंडळ सदस्य आणि इतरांना देखील ही बॅग वाटली जाणार होती. ८८६ हार्ड टॉप, ४ चाकी बॅग खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यासाठी महायुती सरकारने बजेटमध्ये ८२ लाखांचा अंदाजित खर्च देखील ठरवलेला होता. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.