मोफत उपचारासाठी तुम्ही जर रुग्णालयात जाणार असाल तर तुम्हाला उपाचारविना परत जावे लागू शकते. कारण राज्यातील रुग्णालयात मिळणारे मोफत उपचार बंद होण्याची भीती आहे. लाडकी बहीण योजनेमुळे ही वेळ ओढावली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील आरोग्य योजना संकटामध्ये सापडली आहे. त्यामुळे मोफत उपचार बंद होण्याची शक्यता आहे.
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात. मात्र या योजनांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारे जवळपास दीड हजार कोटी रूपये थकले आहेत. आठवडाभरात ही थकबाकी मिळाली नाही तर मोफत उपचार बंद करण्याची वेळ रुग्णालयांवर येणार आहे. यामुळे राज्यातील गोरगरिब आणि सर्वसामान्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.