Special Report : मतदानाचा घटलेला टक्का कुणाच्या फायद्याचा आणि कुणाच्या तोट्याचा?

Special Report | पाचव्या टप्प्यात मतदानाचा टक्का घटला! राजकारण तापलं

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची संधी महाराष्ट्राने गमावली. पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 पैकी बहुतांश मतदारसंघ शहरी भागात असल्याने येथील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसल्याचा पूर्व अनुभव पाहता निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे राज्यात 54.33% टक्के मतदान झाले. राज्यात दिंडोरीत सर्वाधिक 66% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये 47% झाले. मुंबईतल्या अनेक भागात मतदान केंद्राबाहेर लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. पण, तरीही मतदानाची आकडेवारी कमी पहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com