Marathwada News : मराठवाड्यातील पिकांना अतिवृष्टीचा फटका; बघा कुठे किती नुकसान : Video

Rain In Marathwada : मराठवाड्यात पावसामुळे १८ लाखांहून जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरीपाची पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दाणादाण झाली आहे. या विभागातील शेतकऱ्यांचे १८ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून यात खरीपासह फळबागांचा देखील समवेश आहे.

मराठवाड्यात काही काळ पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्यात इथे समाधानकारक पावसाची नोंद झालेली नव्हती. त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर आता दीड-दोन महिन्यांच्या विश्रांतीने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसाने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाढीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. या नुकसानीचे आत्तापर्यंत फक्त ३९.६५ टक्केच पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट बघवी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com