Sambhajinagar Water Crisis News | पाणी चोरीला जाऊ नये म्हणून शेतात कॅमेरा, मिरचीचे घेतले यशस्वी पीक
राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची चोरीही झाली आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने चक्क सीसीटीव्ही लावले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये म्हणून शेतकरी रामेश्वर गव्हाणे यांनी ३६० अंशाचा कॅमेरा लावला आहे. सिल्लोड तालुक्यातले गव्हाणे यांनी मिरचीचे पीक लावले आहे. या मिरचीच्या पिकासाठी या गव्हाणे यांनी शेततळ्यात पाणीही साठवले आहे. हे पाणी चोरी होऊ नये म्हणून त्यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. संपूर्ण मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गव्हाणे यांनी योग्य काटकसर करून पाणी साठवले आहे. आणि यावर मिरचीचे पीक घेतले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.