Saamana Editorial News : अडीचशे कोटी रुपये वाहून गेले, सामनातून राज्य सरकारवर टीका

मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले होते. त्यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र सामनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यावरून ठाकरे गटाने आपले मुखपत्र सामानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. पहिल्याच पावसात २५० कोटी रुपये वाहून गेले असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. हा दोष फक्त पावसाचा नाही तर तुमच्या कट आणि कमिशन कारभाराचा आहे, पहिल्याच पावसात तुमच्या कारभाराची पुरती पोलखोल झाली आहे. तुम्हाला ना मुंबईवर प्रेम आहे ना मुंबईकरांबद्दल. याचा त्रास मुंबईकरांना भोगावा लागला आहे. मुंबईत नालेसफाईच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्या मुंबईकरांचा प्रत्येक पैशाचा हिशोब द्या. मुंबईकर तो तुमच्याकडून घेणार ती वेळ फार दूर नाही असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com