VIDEO: शेकापचे Jayant Patil यांच्या पराभवामागे ठाकरे गटाचा हाथ, Ashish Shelar यांचा गंभीर आरोप

Ashish Shelar on Uddhav Thackeray: शेकापचे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला, पराभवावर आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे.

शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवामागे ठाकरे गटाचा हाथ असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला यावरच आशिष शेलार यांनी हा गंभीर आरोप केला आहे, कपिल पाटील यांच्या पक्षाची स्थापना उद्धव ठाकरे यांनी केली होती त्या कपील पाटलांना संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केल्याच म्हणत शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवामागे देखील उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचं शेलार म्हणाले. राजू शेट्टी, कपिल पाटील आणि जयंत पाटील यांच्यासोबतच आता शरद पवार गटाला देखील संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील असं भाकीत आशिष शेलार यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com