Toll Fare Hike News : मतदान संपताच सर्वसामान्यांना फटका, महामार्गावरील प्रवास आणखी महागला

लोकसभेसाठी मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता महामार्गावरचा प्रवास तीन ते चार टक्क्यांनी महागणार आहे.

नुकतंच लोकसभेसाठी मतदान पूर्ण झाले आहे. मतदानानंतर टोल दरात वाढ करण्यात आली आहे. तीन ते चार टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी टोलच्या दरात वाढ होते. यंदा एप्रिल महिन्यात ही वाढ होणार होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे ही वाढ पुढे ढकलण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ही दरवाढ लागूही झाली आहे. देशभरात एक हजार १०० टोल नाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ होणार आहे. या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन कंपन्यांना होईल असे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com