Rohit Sharma:नागपूर कसोटीत जोरदार विजय मिळवत भारतीय संघाने कसोटी मालिकेला जोरदार प्रारंभ केला आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघावर १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघासाठी आर अश्विनने ८ तर रवींद्र जडेजाने ७ गडी बाद केले. मात्र सामना झाल्यानंतर रोहित शर्माने रवींद्र जडेजा आणि आर अश्विनचा एक रोमांचक किस्सा सांगितला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Latest Sports Updates)
सामना झाल्यानंतर रोहित शर्माने इरफान पठाणला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,"भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू विक्रम करण्याच्या वाटेवर आहे. हे लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की, आज माझे २५० विकेट्स पूर्ण होणार आहेत. मला गोलंदाजी करू दे तर दुसरा गोलंदाज येऊन म्हणतो आज माझे ४५० विकेट्स पूर्ण होणार आहेत. मला गोलंदाजी करू दे. मला त्यांच्या विक्रमांबद्दल काहीच कल्पना नसते."
तसेच तो पुढे म्हणाला की, "वनडे सामन्यात सिराजचे ४ विकेट्स पूर्ण झाले होते. पाच विकेट पूर्ण करण्यासाठी त्याने इनिंगच्या २५ व्या षटकात त्याने आपल्या १० ओव्हर्स पूर्ण करून घेतल्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. अश्विनने आपल्या ५ विकेट्स पूर्ण केल्या. मात्र रवींद्र जडेजाची २५० विकेट्स पूर्ण करण्याची संधी हुकली. दुसऱ्या कसोटी सामान्यात तो आपल्या २५० विकेट्स पूर्ण करू शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.