
सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. .या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला होता. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी संघाला दमदार कमबॅक करुन दिलं. ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात ४ धावांची आघाडी घेतली आहे.
भारतीय गोलंदाजांचं दमदार कमबॅक
भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, १८५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑलआऊट करायचं आव्हान होतं. जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. उस्मान ख्वाजा २ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर सॅम कॉन्टास २३ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिलाच सामना खेळत असलेला ब्यू वेबस्टर या डावात चमकला. त्याने या डावात ५७ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने ३३ धावांची खेळी केली. शेवटी अॅलेक्स कॅरीने २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी
या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण जसप्रीत बुमराहला स्कॅनसाठी जावं लागलं. त्यासाठी त्याला मैदान सोडावं लागलं. या डावात गोलंदाजी करताना त्याने १० षटकात ३३ धावा खर्च करत २ गडी बाद केले.
भारतीय संघाकडूव गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर बुमराहच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डीने २ गडी बाद केले. या दमदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ४ धावांची आघाडी घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.