गुवाहाटी: मणिपूरच्या (Manipur) नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनात मृतांची संख्या शनिवारी २४ वर पोहोचली. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या १८ जवानांचा समावेश आहे. अद्याप ३८ लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली असणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी वॉल रडारचा वापर केला जात आहे. याशिवाय स्निफर डॉगचे पथकही तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत १३ टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि ५ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत १८ टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि ६ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रादेशिक लष्कराचे १२ सैनिक आणि २६ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघातात (Accident) मृत्यू झालेल्यांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी यांचाही समावेश आहे. हवाई दलाची दोन विमाने आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह १४ जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. एका जवानाचा मृतदेह रस्त्याने मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात पाठवला जाईल. मृतदेह पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.