Mata Samman Yojana : सरकारचा मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात जमा होणार ७५०० रुपये; योजना नेमकी काय?
झारखंड सरकारने ३ मार्चला राज्य विधानसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आता या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांनी विधानसभेत सांगितले की, मी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १.४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करत आहे. या अर्थसंकल्पामुळे झारखंडमध्ये आता माता सन्मान योजनेची चर्चाही रंगली होती.
त्यानंतर, असा अंदाज लावला जात आहे की लवकरच झारखंडमधील महिलांच्या खात्यात ७५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेचे पैसे कधी जमा केले जातील, असे प्रश्न बऱ्याच दिवसांपासून उपस्थित केले जात होते. विधानसभेतही अर्थमंत्र्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार?
झारखंडमध्ये सरकारने २०२५-२६ मध्ये माता सन्मान योजनेसाठी १३,३६३ कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. तसेच, अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांनी पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की , होळीपूर्वी , म्हणजेच १४ मार्चपूर्वी, माता सन्मान योजनेचा ३ महिन्यांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात ७५०० रुपयांच्या स्वरूपात जमा केला जाईल. राज्यातील पात्र महिला बऱ्याच काळापासून या योजनेतील पैशाची वाट पाहत आहेत.
माता सन्मान योजनेची रक्कम १५०० रुपयांनी वाढवली!
अर्थमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, लोककल्याणकारी योजना चालवण्यासाठी पैशाची कमतरता नाही. माता सन्मान योजनेच्या रकमेबद्दल विचारले असता, अर्थमंत्र्यांनी सांगितले की पैसे जमा न होण्यामागे काही तांत्रिक समस्या होत्या. आम्ही तुम्हाला सांगतो की योजनेची रक्कम पूर्वी १००० रुपये होती जी सरकारने वाढवून २५०० रुपये केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे आहे. ही योजना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करते आणि महिला सक्षमीकरणाला देखील प्रोत्साहन देते.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.