Delhi Govt: उच्च न्यायालयाचा केजरीवाल सरकारला धक्का; घरपोच रेशन योजना रद्द

दिल्ली सरकार घरोघरी रेशन पोहोचवण्यासाठी दुसरी योजना आणू शकते.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Tv

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारला मोठा झटका बसला आहे. कोर्टाने रेशन घरोघरी पोहोचवण्याची योजना रद्द केली आहे. मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमिन सिंह यांनी गुरुवारी हा निकाल दिला आहे.

उच्च न्यायालयाने सांगितले की, दिल्ली सरकार घरोघरी रेशन पोहोचवण्यासाठी दुसरी योजना आणू शकते. मात्र केंद्र सरकारने दिलेल्या अन्नधान्याने ही योजना चालवता येणार नाही. दिल्ली गव्हर्नमेंट रेशन डीलर्स आणि दिल्ली रेशन डीलर्स युनियनने या योजनेला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जानेवारी महिन्यात निकाल राखून ठेवला होता.

यापूर्वी, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पार्टी सरकारच्या घरोघरी रेशन पोहोचवण्याच्या योजनेवर बंदी घातली होती. या योजनेंतर्गत केजरीवाल सरकारने रेशन घरपोच देण्याचे आश्वासन दिले होते. रेशनची रास्त भाव दुकाने हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com