विषाणूजन्य आजाराचा फैलाव: सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण

कोरोनासारख्या लक्षणांमुळे भीती अधिकच
विषाणूजन्य आजाराचा फैलाव: सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण
विषाणूजन्य आजाराचा फैलाव: सर्दी, खोकल्याने नागरिक हैराणSaam Tv

मुंबई : सततच्या बदलत्या वातावरणाने सर्दी, खोकला, अशक्तपणा अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना अन्य विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळत आहे. श्वसनाशी संबंधित 'रेस्परेटरी सेन्सिशिअल व्हायरस' आरएसव्ही या विषाणूमुळे बाधित झाल्याचे प्रमाण वाढल्यामुळे निदान तज्ज्ञांनी करण्यात आले आहे. मागील काही दिवस ऊन, पाऊस आणि कमी झाले तापमान असे मिश्र वातावरण असल्यामुळे अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव तुलनेने वाढला आहे.

हे देखील पहा-

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या आम्ही प्रथम कोरोना चाचण्या करतो. परंतु, सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग नसल्याचे निष्पन्न होत आहे. यामुळे अशा रुग्णांमध्ये अन्य विषाणूजन्य आजाराने ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळत असल्याची माहिती संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली आहेत. रुग्णांमध्ये आढळणारे लक्षणे कोरोनाच्या लक्षणे सारखीच आहेत.

यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, सर्वात आधी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे उपचारांची दिशा ठरविता येत असते. पण रुग्णांनी कोरोनासारखी लक्षणे दिसली, तरी लगेच घाबरू नये. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. आरएसव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण वाढ झाली असल्याची दिसून येत आहे. हा आजार सामान्यपणे बालकांमध्ये आढळत असतो.

विषाणूजन्य आजाराचा फैलाव: सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण
'प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात कसा असेल?': चंद्रकांत पाटील

परंतु, यावर्षी मोठ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे आढळत आहे. कोरोनाच्या अगोदर प्रौढांमध्ये आरएसव्हीची बाधा होण्याचे प्रमाण सुमारे अडीच ते पाच टक्के प्रमाणात होते. यावर्षी हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन पोहचले आहे, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञांंनी सांगितले आहे. कोरोनाबाधित झाल्यावर रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने प्रौढांमध्ये या विषाणूची बाधा होण्याचे प्रमाण वाढले, असल्याची शक्यता आहे.

आरएसव्हीचे प्रमाण वाढले असले, तरी घाबरण्याचे काही कारण नाही. कारण अन्य विषाणूजन्य आजारांप्रमाणे लक्षणांनुसार यावरती उपचार करण्यात येत असतात. तसेच हा आजार सर्वसामान्यपणे वातावरणात बदल झाले, की आढळत असतो. अन्य विषाणूजन्य आजारांच्या चाचण्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही. यामुळे चाचण्या करण्यावर फारसा भर दिला जात नाही. लक्षणांनुसार उपचार केल्यास हा आजार चार ते पाच दिवसामध्ये बरा होत आहे, असे तज्ज्ञांंनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com