मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन गेल्या काही दिवसांपासून वातावरम चांगलंच तापलेलं दिसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार बेताल वक्तव्य करुन डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील नेत्यांना सीमाभागात येण्यास कर्नाटक सरकारकडून मज्जाव करण्यात येत आहे.
मात्र विरोध डावलून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बेळगावात पोहोचले आहे. यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत यांनी रोहित पवार यांचे ट्वीट रिट्वीट करत, म्हटलं की, जय महाराष्ट्र! मंत्री पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले!इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात.
संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना हा टोला लगावला आहे. कारण ६ डिसेंबरला शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव येथे जाणार होते. मात्र हा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता.
रोहित पवार यांनी बेळगाव दौऱ्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले.
कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील सीमाप्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मध्यस्थी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.