गिरीश कांबळे
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. मनसे देखील अॅक्टिव्ह मोडवर आहे. निवडणुकीआधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार देखील समोर येत आहे. त्यात आता राज ठाकरे यांचं देखील नाव समोर आलं आहे. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. (Latest News Update)
अभिजीत पानसे यांनी म्हटलं की, राजसाहेब मनसे नेत्यांची बैठक घेत असतात. संपूर्ण महाराष्ट्रचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. कोकणचा रस्ता असो, मराठी माणसाचं घरं खाली करणं असो, या सर्व मुद्द्यांसाठी राज साहेब पुढे राहिले आहेत. (Politics News)
मुंबईत मराठी माणूस हरवून गेला आहे. मराठी पाट्यांच्या विषय राज साहेबांनी मांडला. मनसेने आंदोलने केली आणि संपूर्ण आढावा घेऊन आम्ही आता पुढे येत आहोत. अनेक लोकं बोलली मनसेच्या बाजूने वातावरण आहे. राज साहेब लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आहोत, असं अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.