मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटील यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, जनता...

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.
jayant patil
jayant patil saam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Jayant Patil News : राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येऊन १ महिना लोटला आहे. तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. त्यामुळे राज्याचा कारभार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे चालवत आहेत. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुणे पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुका, बदललेली प्रभाग रचना आणि राजकीय विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सदर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. जयंत पाटील म्हणाले, ' आज राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ३६ पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर काय प्रतिक्रिया द्यायची, जनता बघत आहे'.

jayant patil
ओबीसी समाजाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सातशे ते साडे सातशे निर्णय घेतले आहेत. तर निवडणुकीला घाबरून जाऊन प्रभाग रचना बदलल्या आहेत. भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र येऊन जे निर्णय घेतले आहे, त्याला लोकांचे समर्थन आहे की नाही यासाठी निवडणूका घ्याव्यात', असे ते म्हणाले. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले गेल्याचे असं मी कधी ऐकलं नाही. शिंदे सरकारची मंत्री नेमण्याची क्षमता नाही आहे, कायदा धाब्यावर बसवून सरकार चालवत आहेत'.

jayant patil
मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

'एकनाथ शिंदे यांनी एवढी लांब उडी मारली आहे. कुणाची विचारधारा केव्हा बदलते सांगता येत नाही. एकनाथ शिंदे हे माझ्या शेजारी बसायचे, त्यांना कधी वाटलं नाही ते मुख्यमंत्री होईल. त्यांचा स्वभाव चांगला आहे. मात्र, त्यांनी जे केलं, ते योग्य केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर सर्वच्या सर्व ४० आमदार हे उद्धव ठाकरे यांना भेटतील, त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही', असेही पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com