राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी

राज्यात २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये अधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२०मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४ हजार ९७१वर पोहचली होती.
राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी
राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारीSaam TV

मुंबई: राज्यातील रस्ते अपघाताची (Road Accident) मालिका वाढत चालली आहे. गेल्या वर्षात राज्यात २६ हजार २८४ रस्ते अपघात झाले आहे. यामध्ये १४ हजार २६६ प्रवासी जखमी झाले असून रस्ते अपघातात ११ हजार ९६० प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत (Mumbai) झाल्याची माहिती समोर आली. जानेवारी- नोव्हेंबर या अकरा महिन्यात मुंबईत १ हजार ८४४ रस्ते अपघात झाले आहे. यामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्यात २६ हजार २८४ अपघात

राज्यात २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये अधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२०मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४ हजार ९७१वर पोहचली होती. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १३ हजार ९७१ लोक गंभीर जखमी झाले होते. याउलट २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६ हजार २८४ पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून १४ हजार २६६ लोक गंभीर जखमी झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी- नोव्हेंबर या अकरा महिन्यात मुंबईत १ हजार ८४४ रस्ते अपघात झाले आहे. या अपघात २५८ नागरिकनांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार २४३ लोक गंभीर जखमी आहे.

राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी
दारु भोवली! पत्नीनं घेतलं पेटवून पतीचाही मृत्यू; 3 वर्षाचा चिमुकला अनाथ

राज्यातील अपघातांची आकडेवारी

मुंबई १ हजार ८४४,

नाशिक १२९६,

पुणे १२२८,

अहमदनगर १२०७,

कोल्हापूर ९२६,

सोलापूर ८६२,

नागपूर ८६०,

सातारा ७२९,

ठाणे ७०७,

नांदेड ६९३,

जळगाव ६६७,

बीड ६३२,

चंद्रपूर ६२८,

या जिल्हात जानेवारी- नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत.

सर्वाधिक अपघाती मृत्यू या जिल्हात -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघाती मृत्यूमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यामध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतोय.

नाशिकमध्ये ७८४,

पुणे ७२०,

सोलापूर ४८३,

सातारा ४३५,

अहमदनगर ६९३,

जळगाव ४४३,

बीड ३८५

कोल्हापूर ३४६

आणि औरंगाबादमध्ये ३६५ अपघाती मृत्यू झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com