नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. या लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झालं आहे. आज सोमवारी सकाळी नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यानंतर आता नाशिकमधील मतदान केंद्रात शांतिगिरी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप करणाऱ्या शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शांतिगिरी महाराजांनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शांतिगिरी महाराज मतदानासाठी मतदानकेंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनला हार घातला.
या प्रकारामुळे शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने मतदान केंद्रावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने त्यांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू केली आहे.
मुंबई ईशान्य मुंबई मतदारसंघात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची चिठ्ठी घेऊन बसल्याने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'आम्ही मतदान केंद्रावर नागरिकांना पोहोचवत असून पोलिसांनी दडपशाही करत ताब्यात घेतलं, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.