Mumbai-Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गाबाबत महत्वाची अपडेट; वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

Ajit pawar on Mumbai-Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गाबाबत महत्वाची अपडेट; वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना
Mumbai Nashik Highway Saam TV
Published On

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत

मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार रईस शेख, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह इतर मंत्री आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई-नाशिक महामार्गाबाबत महत्वाची अपडेट; वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना
Video: Ajit Pawar यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली कबुली भोवणार? नेमकं प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा आणि प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत होत आहे. नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे, तसेच त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे'.

'या महामार्गावरील खड्डे वेळीच बुजविल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्र, या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

मुंबई-नाशिक महामार्गाबाबत महत्वाची अपडेट; वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना
VIDEO: Ajit Pawar यांच्या बालेकिल्ल्यावर भाजप दावा ठोकणार? 'या' मतदार संघावरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता

'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com