मुंबई: आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मेट्रोचे काम थांबले होते. आरे कारशेडला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडवर स्थगिती दिली होती.
काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड तिथेच होणार असल्याचे संकेत दिले होते. 'कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरु होणार नाही. शिवाय ठाकरे सरकाने सुचवलेली कांजूरमार्ग येथील जागा वादात आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या जागेवर आता काम सुरु केलं तरी ते पुर्ण व्हायला जवळपास ४ वर्ष लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड त्याच ठिकाणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
मुंबईतील मेट्रो हा भाजपचा (BJP) महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे भाजपला तो प्रकल्प पूर्ण करायचा आहे. तर आरे मध्ये होणाऱ्या कारशेडला मुंबईतील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. या कारशेडविरोधात मुंबईत मोठे आंदोलन झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली होती.
एकनाश शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर पुन्हा आरे कारशेड सुरू होणार असल्याच्या सुरू झाल्या. आरे मधील जंगल तोडू नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंदी उठवल्यानंतर पुन्हा आरे कारशेडचे काम सुरू होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.