मुंबई : उत्तर भारतात हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलं आहे. थंडीसह आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. (Weather Update)
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत बदललेल्या वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.