कोरोनामुळे रघुवीर घाटात पर्यटकांना बंदी

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या घाटातून दिसणारे निसर्गसौंदर्य चांगलेच बहरू लागले आहे.
कोरोनामुळे रघुवीर घाटात पर्यटकांना बंदी
कोरोनामुळे रघुवीर घाटात पर्यटकांना बंदीGoogle

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कलम 144 लागू आहे. असे असताना रत्नागिरीतील निसर्गरम्य रघुवीर घाटात पर्यटकांची गर्दी झाल्याने खेडचे प्रांताधिका-यांनी पुढील आदेश होईपर्यंत रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी घाटवारी करणाऱ्यांची निराशा झाली.

रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याला जोडणारा हा घाट पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या घाटातून दिसणारे निसर्गसौंदर्य चांगलेच बहरू लागले आहे. उंच कड्यावरून खाली फेसाळत कोसळणारे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. मनाला मोहून टाकणारे हे सौंदर्य पाहण्यासाठी  घाटात शेकडो पर्यटक येतात त्यामुळे गर्दी होते कोरोनाचे नियमाचे उल्लंघन होते,  त्यामुळे सद्यस्थितीत हा घाट बंद करण्यात आला आहे.

Edited By - Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com