- शुभम देशमुख
भंडारा जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह (obc hostel) व्हावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना पत्र लिहून केली आहे. तब्बल एक हजार पत्रांद्वारे विद्यार्थ्यांनी ओबीसी समाजाच्या मागण्या आणि वसतिगृहाची मागणी केली आहे. (Maharashtra News)
राज्यात ओबीसी समाजाचा मोठा वर्ग असून सुध्दा ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या रेंगाळल्या आहेत. राज्यभर प्रत्येक जिल्हयात ओबीसी वसतिगृह 15 ऑगस्ट पूर्वी तयार करणार असल्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
भंडारा जिल्हयात शेतकरी शेतमजूर यांची मुल आहेत. 12 वी पर्यंत ग्रामीण भागात शाळा कॉलेजेस आहेत. परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याना शहरात जावे लागते. त्यामुळे शहरात भाड्याने खाेली घेऊन राहणे परवडत नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे शहरात ओबीसी वसतिगृह लवकरात लवकर व्हावे यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सिहोरा येथील ओबीसी विद्यार्थ्यांनी 1000 पत्र मुख्यमंत्री यांना लिहले आहे. याबराेबरच भंडारा जिल्ह्यातून लाखो पत्र लिहले जाणार आहेत अशी माहिती संजय मते (ओबीसी क्रांती मोर्चा संयोजक) यांंनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.