बीड - पाणी प्रश्नावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी, राष्ट्रवादीचे (NCP) नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांनी कोणताही निधी आणि मान्यता न घेता, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढून, मराठवाड्याची फसवणूक केली आहे. असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच याविषयी कारवाई व्हावी, यासाठी वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार असल्याचा इशारा आमदार धस यांनी एक प्रकारे जयंत पाटलांना दिला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजप आमदार सुरेश धस यांनी, तब्बल 70 गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला आहे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र, आ.धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या कामासाठी 1500 कोटी रुपये उपसा जलसिंचन योजना मधून मंजूर झाले होते. मात्र सुरेश धस यांनी पत्र दिल्याने कामाला स्थगिती देण्यात आली आहे. असं आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
हे देखील पाहा -
यावरून आरोपानंतर आमदार सुरेश धसांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, की निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना अशा प्रकारची खोटी निविदा काढताचं येत नाही. ती निविदा काढण्यात आलीय. त्यामुळं माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खोटीनाटी याला मान्यता दिली आहे.
जलसंपदा मंत्री म्हणून पाटलांनी खोटं नाट काम केले, खोटी निविदा काढली, प्रेशराईज केलं, त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी, राष्ट्रवादीचे नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलाय. तर त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे. आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे. असा एक प्रकारचा इशारा धस यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.