
>>संजय डाफ, नागपूर
Accidents On Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी तसेच मराठवाडा-विदर्भच्या विकासालाही चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र आता हाच समृद्धी महामार्ग मृत्यू मार्ग बनला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या 100 दिवसांत य महामार्गावर तब्बल 900 अपघात झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Expressway) सुरु झाल्यापासून शंभर दिवसात या मार्गावर नऊशे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचं वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा मार्ग बनवण्यात आला खरा मात्र आता तो मृत्यूचा मार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marthi News)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ मुंबईशी जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या मार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्यासह मराठवाडा आणि विदर्भच्या विकासालाही चालना मिळेल असा या महामार्गाचा उद्देश आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.