
नंदुरबार: हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाचे आगमन नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात हलक्या सरींनी सुरुवात झाली आहे. 18 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच दमदार पाऊस झालेला नाही.
त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची योग्य ती वाढ झालेली नाही. तर काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत ५३ टक्के कमी पाऊस झाला आहे. जून, जुलै आणि ऑगस्टच्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात फक्त 34 टक्केच पाऊस झाला आहे.
पावसाचे आता जेमतेम चाळीस दिवसच बाकी असून पुढच्या कालावधीत चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अखेर तब्बल दीड महिन्यांनी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने शेती पिकांना मोठा फायदा होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.