पूर्वसूचना न देता वन विभागाद्वारे पिकाची नासाडी..तीन एकर मका कापून फेकला

पूर्वसूचना न देता वन विभागाद्वारे पिकाची नासाडी..तीन एकर मका कापून फेकला
पूर्वसूचना न देता वन विभागाद्वारे पिकाची नासाडी..तीन एकर मका कापून फेकला

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नावली गावातील शेतकरी भांग्या वळवी हे खोलविहीर वनपरिक्षेत्रात उदरनिर्वाहासाठी गेल्या १० वर्षापासून वनजमीन कसत आहे. वडिलोपार्जित दुसरी शेती नसल्यामुळे उपजीविका करण्यासाठी सदर वन जमीन मिळावी; असा दावा शेतकऱ्याने दाखल केला आहे. या जमिनीवरील तीन एकर क्षेत्रावर यंदा मका व ज्वारी पिकाचा पेरा केला होता. परंतु वन विभागाने सदर वन जमिनीचा दावा मंजूर नसल्याचे सांगत कापणीला आलेल्या मका पीक उद्ध्वस्त केले आहे, (nandurbar-news-navapur-crop-destroyed-by-the-forest-department-without-any-prior-notice-in-farmer)

शेतातील पिकाच्‍या नुकसानीसह शेतीची राखदारी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या झोपडी व त्यातील अन्नधान्य, कपडे जाळून टाकले आहे. गेल्या दोन वर्षांपासूनचा कोरोना संकट तसेच यंदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाला आहे. परिवाराच्या उपजीविकेसाठी वनजमिनीवर केलेली शेती कापणीला आल्यावर पूर्वसूचना न देता वनविभागाने नष्ट केल्याने शेतकऱ्याने पेरणीपासून आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर तसेच बियाणे खत व फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. याबाबत संबंधित विभागाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आहे.

म्‍हणे योग्य तीच कारवाई

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उभे पीक कापून नष्ट केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वरिष्ठ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्ही योग्य तीच कारवाई केली असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तरी काढणीला आलेल्या पिकांचे केलेले नुकसान कितपत योग्य आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सत्यशोधक कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने हे सांगण्यात आले आहे.

पूर्वसूचना न देता वन विभागाद्वारे पिकाची नासाडी..तीन एकर मका कापून फेकला
रोमीओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा; जबरदस्‍ती लग्नासाठी पिस्तुलचा धाक

उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. तसेच यंदा पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने शेतीच्या उत्पादनात ही घट झाली आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीवर केलेली शेती वन विभागाने पूर्वसूचना न देता उध्वस्थ केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com