नंदुरबारकारांची पाणी कपात; दसऱ्यानंतर दोन दिवसाआड़ पाणी

नंदुरबारकारांची पाणी कपात; दसऱ्यानंतर दोन दिवसाआड़ पाणी
नंदुरबारकारांची पाणी कपात;  दसऱ्यानंतर दोन दिवसाआड़ पाणी

नंदुरबार : नंदुरबार शहराला दसऱ्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतला आहे. (nandurbar-news-nagarpalika-decission-water-supply-on-two-days-in-dasara)

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचेक धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नंदुरबारकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कमी पावसाचा परिणाम

नंदुरबार जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबार नगरपरिषदेने दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. नंदुरबार शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करून पाणीबचत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही.

पाण्याचे नियोजन

जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यावर व शेती सिंचनावर मोठा परिणाम होणार असून प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असून नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची काळाची गरज आहे. अन्यथा पाणीबाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com