OBC Community Agitation
OBC Community Agitationसंग्रहित छायाचित्र

OBC Samaj Andolan: ओबीसी आंदोलनाला यश? आमरण उपोषण २९ तारखेपर्यंत स्थगित, पण..

OBC Community Agitation: ओबीसी समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला येत्या २९ तारखेला चर्चेसाठी बोलवलंय.
Published on

OBC Samaj Protest:

ओबीसी समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला येत्या २९ तारखेला चर्चेसाठी बोलवलंय. बैठकीच्या निमंत्रणाचे पत्र माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि आशिष देशमुख यांनी दिले. परंतु आंदोलन मागे घेण्याची विनंती विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नाकारलीय. दरम्यान या बैठकीसाठी कुणबी कृती समिती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ४५ प्रतिनिधी या शिष्टमंडळात असणार आहेत. त्यामुळं गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला यश मिळताना दिसतंय. (Latest News)

मराठ्याना कुणबी दाखले देण्याच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यश मिळाल्याचं दिसत आहे. सरकारनं आंदोलन करणाऱ्यांमधील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं आहे. बैठकीसाठी बोलवल्यामुळे ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळांनं २९ सप्टेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. पण साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

२९ तारखेला सरकारसोबत चर्चेत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर राज्यभरातील आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागे घेणार, असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलीय.

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केलं होतं. राज्य सरकारनं जरांगे पाटलांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. परंतु जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी समाजाकडू विरोध होतोय. आपल्या हक्काचे कोणी हिरावून घेणार नाही. तसेच जातीनिहाय जनगणना झाली की हा प्रश्न सुटेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिलीय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही ओबीसी समाजाची प्रमुख मागणी आहे. याबाबत आणि इतर मागण्यांचे सरकारने लेखी आश्वासन द्यावे, असंही ओबीसी नेते म्हणालेत.

या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतलाय. राज्य सरकारने बोलवलेल्या बैठकीत इतर राजकीय नेत्यांना बोलवलं नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते आंदोलनात होते, मात्र त्यांना बैठकीत बोलविले नाही. तर बैठकीला बोलविण्यात आलेल्या शिष्टमंडळात भाजपचेच नेते आहेत. इतर पक्षातील नेते यात नाहीत.

आम्ही ओबीसी मागण्यांसंदर्भात भांडत असतो म्हणून आम्हाला चर्चेला बोलविले पाहिजे, म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले आहे ते पाळावे. ज्याप्रमाणे धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली त्याप्रमाणे ओबीसी समाजासोबत करू नये, असंही अनिल देशमुख म्हणालेत.

OBC Community Agitation
OBC Agitation: ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाला मिळाली भेटीची वेळ; २९ सप्टेंबरला होणार राज्य सरकारसोबत बैठक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com