Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetty On Maharashtra Government: शेतकरी नेते राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी हे सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर अशा शब्दात टीका केली.
Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक
Raju ShettySaam Tv
Published On

'जिथे जिथे ताफा घेऊन मंत्री फिरतील तिथे तिथे भरसभेत महाराष्ट्रामधील मंत्र्यांना तुडवा.', असे खळबळजनक विधान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पांठिंबा दिला. यावेळी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बच्चू कडू गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करत आहेत पण अद्याप त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही त्यामुळे राजू शेट्टी संतप्त झाले.

राजू शेट्टी यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. 'पैसे नाही तर मग ६५ हजार कोटी खर्च करून समृद्धी महामार्ग कसा बांधला? हे सरकार म्हणते २०२८ मध्ये कर्जमाफी करू. पुन्हा २०२९ मध्ये सत्तेत येण्याचा यांचा डाव आहे. या कर्जाची जबाबदारी घ्या. सरकारला कर्जमुक्त करा. लाखो कोटीची प्रकल्प कसे उभे करता?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, 'जिथे जिथे ताफा घेऊन मंत्री फिरतील तिथे तिथे भर सभेत महाराष्ट्रामधील मंत्र्यांना तुडवा.', असे आवाहन राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना केले आहे.

Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, शासन निर्णय जारी

यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशाराच दिला. त्यांनी सांगितले की, 'विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं आणि सत्तेत आलं की शेतकऱ्यांबदल बोलायचं नाही. बुलेट ट्रेन प्रकल्प बंद करा. शक्तीपीठ महामार्ग काम बंद करा. आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. बच्चूभाऊ सातबारा कोरा केलाशिवाय मागे हटू नका. सरकारने जर आजच्या बैठकीत किंवा उद्या निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरू देणार नाही. आता ही लढाई आरपारची आहे.'

Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक
Maharashtra Government : फडणवीस सरकारचे महत्त्वाचे १० निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय ठरलं?

तसंच, 'हे आंदोलन न्याय मागणाऱ्या सर्व सामन्य जनतेचं आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला पाहिजे. पाच दिवस झाले पण सरकारला दया येत नाही. इंग्रजांचे राज्य होते म्हणून गांधीजी यांनी अन्नत्याग केलं होतं. हे सरकार इंग्रजांपेक्षा भयंकर आहे. यांना अजिबात आत्मक्लेश करायला वेळ नाही. वाळू माफियाच्या वाढदिवसाला पालकमंत्री हेलिकॉप्टर ने येतात पण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यायला वेळ नाही. लाज वाटली पाहिजे. या सरकारला सर्वसामान्य माणसाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.', असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Maharashtra Politics: ...तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना भरसभेत तुडवा, शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक
Maharashtra Government Decision: राज्य सरकारचा निर्णय; विधि आणि न्याय विभागात नोकरीची संधी, Typistच्या नवीन ५ हजार पदांची निर्मिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com