Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळ अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा आरोप झाल्याने वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या संंबंधिचे आरोप करत याबाबतीत सरकार कोणाला पाठीशी घालत आहे, असा सवालही विचारला होता. याच वादावर विधीमंडळाच्या आजच्या कामकाजात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Winter Session)
याबाबत अधिक माहिती अशी की,शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात शिंंदे गटाचे आमदार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने विरोधकांनी यावर जोरदार टिका केली होती. विरोधकांच्या याच आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवरच पलटवार केला आहे.
याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, "ज्या कंपन्यांना अपात्र केले होते त्यांना पात्र करुन ही परिक्षा घेण्यात आली, तसे झाले नसते तर घोटाळा घडलाच नसता, हा सगळा घोटाळा मंत्रालय स्तरावर घडला असून, निश्चितपणे अपात्र लोकांना पात्र करून घोटाळा कोणी केला याची उच्चस्तरीय चौकशी करुन दोशींवर कडक कारवाई केली जाईल," अशी घोषणा यावेळी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.