जळगाव : विहिरीतील पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. याचा राग येवुन धानवड येथील कुटूंबाव कुऱ्हाड लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवल्याची घटना घडली. पोलिसांत तक्रार दिली. त्याच वेळेस संबधीत बिट अंमलदार किंवा अधिकाऱ्याने दखल घेतली असती तर, कुऱ्हाड हल्ला टाळता आल असता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-dhanvad-village-Anger-of-reporting-to-the-police-And-ax-attack-on-family)
धानवड येथील अशोक पंडीत पाटील यांच्या शेतात विहीर आहे. त्या विहीरीतून अरुण मधुकर पाटील बळजबरी मोटार लावून पाणी घेतात; असा अशोक पाटील यांचा आरोप आहे. या कारणावरुन अशोक पाटील व अरुण पाटील यांच्यात वाद आहे. या वादातून झालेल्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणी अशोक पाटील यांचा मुलगा राजेंद्र याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा तर नोंदवला मात्र त्यावर साधी चौकशी सुद्धा केली नाही. परिणामी हिच तक्रार मोठ्या भांडणाचे कारण होवुन फिर्यादीच्या घरावर हल्ला चढवण्यात आला.
पोलिस तक्रारीचा राग
आपल्या विरुद्ध तक्रार केल्याचे समजताच अरुण मधुकर पाटील, जयवंताबाई पाटील, गोलू अरुण पाटील, पप्पू अरुण पाटील या चौघांनी रविवार (३१ ऑक्टोबर) लाकडी दांडके व कु-हाडीसह अशोक पाटील यांच्या घरात प्रवेश करत हल्ला केला. या घटनेत अशोक पाटील, त्यांची सुन, मुलगा व पत्नी असे चौघेजण जखमी झाले. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अशोक पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात चौघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण पाटील व गोलू पाटील या दोघांना अटक करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.