हिंगोली : मराठवाड्यात तापमानाच्या भीषण झळा नागरिकांचा घसा कोरडा करत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटी हिंगोलीच्या (Hingoli News) सेनगाव तालुक्यातील 50 गावांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरी हातपंप व बोरवेल पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक सकाळपासून पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. (Latest Marathi News)
हिंगोली जिल्ह्यात असलेल्या अश्या कठीण स्थितीत मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी पाणी टंचाईच्या आढावा बैठकीचे आयोजन केल्याचे सांगत लवकर पाणी टंचाई दूर करू असे कोरडे आश्वासन देत आहेत. मात्र सेनगाव तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावातील नागरिकांनी आम्हाला आश्वासन नको; टँकरद्वारे थेट पाणीपुरवठा सुरू करा अशी मागणी केली आहे.
नागरीक स्वतः मागवताय टँकर
या भागातील जयपूर गावात भीषण पाणीटंचाईचा संकट वाढवल्याने गावातील नागरिकांनी आता प्रशासनाची वाट न पाहता टँकरने पाणी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. शंभर रुपयांमध्ये मोठी टाकी तर पाच रुपयांमध्ये हंडाभर पाणी हे गावकरी टँकर मधून घेत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.