बीड - बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये आवश्यकतेनुसार पाऊस पडला नसल्याने, आजही लघु प्रकल्प, पाझर तलाव, बंधारे व नदी-नाले कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने, पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
हे देखील पहा -
शिरूर शहराला पाणीपुरवठा करणारा सिंदफणा बंधारा कोरडा झाल्याने यात भरपावसाळ्यात जनावरे चरत आहेत. तर अर्धा पावसाळा सरून गेल्यानंतरही नदी, नाले, ओढे, कोरडे असल्याने चिंता व्यक्त केली जात असून पिके धोक्यात आली आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर पिके जळून जातील.
अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची भीषणटंचाई निर्माण होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान जायकवाडी प्रकल्पावरून पाण्याची योजना आखावी, तेव्हाच शिरूर शहरासह तालुक्यातील पाणी प्रश्न मिटेल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पवार यांनी केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.