औरंगाबाद - पैठण येथील नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून कार पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पैठण(Paithan) शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह जुने कावसान शेवगाव कडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावर ही घटना घडली.
सुदैवाने या अपघातात (Accident) कुठलीही जीवितहानी झाली नसून ३ जण जखमी झाली आहे. तर कारचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कार पुलावरून गोदावरी नदीच्या पाण्यात कोसळल्याची माहिती मिळताच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून कारची काच फोडून तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर जखमी तिघांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक आहे.
पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह, जुने कावसान, शेवगावकडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या (Nathsagar Dam) समोर असलेल्या पुलावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. मात्र या पुलाला सुरक्षा कठडे नाहीत.
त्यामुळे अनेकदा असे अपघात होत असतात. त्यामुळे पुलावर सुरक्षा दृष्टिकोनातून लोखंडी कठडे बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र जायकवाडी प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.