बुधवारी (२१ सप्टेंबर) एकादशी असल्याने अनेक लोकांनी (Buldhana) उपवास व्रत ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चक्कर येण्यासारखे झाले. काहींना वाटले की ॲसिडीटीमुळे हे सर्व होत आहे. परंतु तब्येत अधिक बिघडताच त्यांना चिखलीमधील काही वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
गावातील दुकानातून भगर खरेदी
ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला आहे. त्या सर्वांनी आपल्या गावातीलच दुकानातून भगर विकत घेतले होते. स्थानिक दुकानदारांनी तो माल चिखलीमधून घेतल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. याबाबत तपासणी केली जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.