अमरावती : अमरावती येथे नुकताच हिंसाचाराची घटना घडली. भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची झालेल्या हिंसाचारा नंतर प्रथमच अमरावती पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त आरती सिंह यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनदिनी निरपराध लोकांची पोलिस धरपकड करत असून ते पोलिसांना थांबविण्याचे आदेश द्यावेत. बांगलादेशी नागरिकांची चाैकशी करावी अशी मागणी बाेंडेंनी anil bhonde केली आहे.
अमरावती शहरात दीर्घकालीन शांतता रहावी यासाठी अमरावतीमधील काही बांगलादेशी नागरिकांची चाैकशी झाली पाहिजे. खरं त्यांना शहराबाहेर काढावे कारण नुकत्याच झालेल्या मोर्चात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग हाेता असा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला. दरम्यान हिंसाचाराची उच्च न्यायालयात मार्फत चौकशी व्हावी, रजा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणी बाेंडंनी केली आहे.
दरम्यान शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे. पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी चर्चेदरम्यान मागण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे बाेंडेंनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.