औरंगाबाद: मराठवाड्यातील गरीब शेतकऱ्यांकडून कोट्यवधींची लूट करणारा 30-30 घोटाळ्यातील (30-30 Scam) आरोपी कंगाल असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये आपल्याला परत मिळतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरातल्या गावागावात आता तीच चर्चा सुरू झाली आहे. राज्यभर गाजलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील 30-30 घोटाळ्यातला मुख्य आरोपी संतोष ऊर्फ सचिन राठोड याच्यासह 6 जणांविरोधात न्यायालयात तब्बल 500 पानांचे आरोपपत्र ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केले. (30-30 Scam Latest Marathi News Updates)
पोलीस चौकशीत आरोपीच्या नावावर कोणतीही संपत्ती नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळेबाज कंगाल असल्याने ज्या गरीब शेतकऱ्यांची लूट केली, त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणं कठीण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी 30-30 घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड याच्यासह कृष्णा राठोड आणि पंकज चव्हाण यांच्या विरोधात दौलत राठोड यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या घर झडतीत सापडलेल्या डायरीत 300 जणांनी कोट्यवधीची गुंतवणूक केल्याच्या नोंदी सापडल्या होत्या.
त्याशिवाय नाशिक, कोलकाता येथे संपत्ती जमा केल्याचीही चर्चा होती. मात्र, अधिकृतपणे कोठेही गुंतवणूक केली नसल्याचे आढळले, तसेच त्याच्या नावावर कोठेही संपत्ती आढळली नाही. संतोष राठोडच्या विविध बँक खात्यात कोणतीही रक्कमही नाही. आरोपीने खरेदी केलेल्या गाड्याही गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विकून टाकल्या होत्या. त्यामुळे आता गुंतवणूकदार शेतकऱ्यांना पैसे मिळणे कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे कोट्यवधीची लूट करून त्यांनी पैसे कुणाला दिले, हा प्रश्न उपस्थित झालाय.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.