- अमर घटारे
न्यायालयीन प्रक्रियेमुळे अमरावती जिल्हा परिषदेने राखीव ठेवलेला निकाल कधी लागणार याची चिंता अमरावती येथील युवक-युवतींना लागली आहे. दिवसेंदिवस निकाल पुढे जात असल्याने अमरावती जिल्हा परिषद येथे 195 पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचा-यांना देखील कधी एकदा निकाल लागताे याची उत्सुकता लागून राहिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अमरावती जिल्ह्यतील मेळघाटातील पेसा क्षेत्राशी संबंधित असलेल्या पाच संवर्गातील भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे या संवर्गातील 462 पदांची परीक्षा रखडली आहे.
आतापर्यंत उर्वरित 17 संवर्गातील 60 पदांचे निकाल घोषित झाले आहेत. दरम्यान 3 संवर्गातील 195 पदांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. (Maharashtra News)
न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या सर्वाधिक 462 पदांची परीक्षा झालेली नाही. त्यातील केवळ पशुधन पर्यवेक्षकाच्या 11 पदांची परीक्षा झाली आहे. परंतु त्याचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार याची प्रतिक्षा उमेदवारांना लागून राहिली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.