
निर्जला एकादशीचं व्रत हा सर्वात कठी मानला जातो. कारण हा उपवास करताना पाण्याचा घोटही प्यायचा नसतो. असं म्हटलं जातं की, निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने तुमच्या पूर्वीच्या जन्माचे पापंही नष्ट होता.
धार्मिक मान्यतेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते. हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की ते वर्षातील सर्व एकदाशींच्या फळाएवढं असतं.
हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. तसंच ते भक्तांवर त्यांचा अनंत आशीर्वाद वर्षाव करतात. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येऊ शकते.
धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा उपवास केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शुद्धीकरण देखील प्रदान करते. पाणी आणि अन्न सोडल्याने इंद्रियांवर नियंत्रण वाढतं. ज्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होऊ शकते. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचं पुण्यकर्म वाढतं. या व्रतामुळे दान आणि तपस्येसारखेच फळ मिळतं.
असं मानण्यात येतं की, जो व्यक्ती निर्जला एकादशीचे व्रत भक्तीने करतो त्याला मृत्युनंतरच्या दूतांची भीती वाटत नाही. शिवाय त्या व्यक्तींला वैकुंठ धाममध्ये स्थान मिळतं. हा कडक उपवास एखाद्या व्यक्तीच्या धर्माप्रती असलेल्या समर्पणाचे आणि देवावरील त्याच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे.
पौराणिक कथेनुसार, पांडूचा मुलगा भीमसेन याला अतिप्रमाणात भूक लागली होती. यावेळी भूकेमुळे एकादशीचे व्रत करणं शक्य नव्हते. त्यानंतर महर्षी व्यासांनी त्याला निर्जला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रतामुळे त्याला वर्षातील सर्व एकादशींचं फळ मिळाले. म्हणूनच तिला "भीमसेनी एकादशी" असंही म्हटलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.